मराठी राजभाषा दिन भाषण
क्या आप मराठी राजभाषा दिन भाषण (Marathi Rajbhasha Din Speech) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं
इस पोस्ट में मैंने आपको मराठी भाषा दिवस खूप सोपे व सुंदर भाषण बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
1) मराठी भाषा दिन खूप सोपे व सुंदर भाषण 10 ओळी
- सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो….सर्वांना माझा नमस्कार !
- आज २७ फेब्रुवारी! हा दिवस आपण ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करीत आहोत.
- सर्वप्रथम, सर्वांना ‘मराठी भाषा दिनाच्या’ खूप-खूप शुभेच्छा !
- थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे होते.
- कवी कुसुमाग्रन थोर मराठी लेखक, साहित्यकार, नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते.
- त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
- मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा व अधिकृत राजभाषा आहे.
- मराठी खूप सुंदर भाषा असून अनेक थोर संत, कवी, लेखक इ. नी विपुल लेखन केले आहे.
- आजच्या पिढीनेही मराठी भाषेची सुंदरता समजून घेऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.
जय महाराष्ट्र ! जय मराठी !
Read More :-
2) मराठी राजभाषा दिन भाषण – Marathi Bhasha Din Bhashan
लाभले आम्हांस भाग्य
बोलतो मराठी
जाइलो खरेच धन्य
ऐकतो मराठी….
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व मराठी भाषा जाणणा-या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, प्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज २७ फेब्रुवारी, मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कांदबरीकार, लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी १९२२ रोजी महाराष्ट्र भूमीत कवी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला.
कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्यनिर्मिती केली. त्यांनी अनेक सरस कथा, कांदब-या, कविता नाटक, निबंध इ. चे कुशल लेखन केले.’ ‘नटसम्राट’ हे अजरामर नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते. ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह त्यांचे भारतीय साहित्यातील उत्कृष्ट काव्य ठरले आहे.
कुसुमाग्रज या मराठी साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत भर घातली. महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांना अभिवादन म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा आहे. भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांची अधिकृत राजभाषा मराठी आहे. भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणा-या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे. मराठी ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे.
मराठी ही अनेक संतांच्या कीर्तन, ओव्या, भारूड, भजनांनी सजली आहे. ती अनेक साहित्यिकांचा प्राण आहे. ती कित्येक प्रतिभासंपन्न लेखकांच्या लेखणीने समृध्द झाली आहे. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, शांता शेळके, आचार्य अत्रे अशा अनेक साहित्यिकांनी मराठीचे महत्व वाढवले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तर अमृतापेक्षा तिचा गोडवा अधिक मानला आहे.
आपण सर्वांनी मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात अधिक वापर केला पाहिजे. मराठी ग्रंथ वाचन केले पाहिजे. चला तर मग आजच्या इंटरनेटच्या युगात मराठीचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार करूया. मराठी भाषेला अजरामर बनवूया ….
धन्यवाद !
जय हिंद…
जय भारत….
जय महाराष्ट्र….
FAQ’s – सतत विचारले जाणारे प्रश्न
मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो ?
27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.
मराठी भाषा दिन का साजरा केला जातो ?
कविवर्य कुसुमाग्रजांच्या योगदानाची आठवण म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
Read More :-
मराठी राजभाषा दिन भाषण (Marathi Rajbhasha Din Speech) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.
अतिशय सुंदर !
धन्यवाद !